आज पुन्हा दचकून जागा झालो. पुन्हा तेच स्वप्न पडलं होत. तोच ओळखीचा हसरा चेहरा. अशीच अधून मधून येते ती स्वप्नात. आणि अस्वस्थ करून जाते.
जवळपास ७ वर्षांपूर्ची गोष्ट आहे. माहूरचं एक काम आटोपून परत निघालो होतो. अजित आला होता बस-स्टँड वर सोडायला. अडीच वाजताची पांढरकवडा नांदेड गाडी लागलेली होती. त्यात आधी जाऊन जागा पकडली आणि मग उस्मान भाई कडून खारे दाणे , ठाकरे मामाकडून वर्तमान पत्र घेणे, भिक्षुकांना असेल ती चिल्लर देणे, असा नेहेमीचा कार्यक्रम उरकून जागेवर येऊन बसलो. प्रवास फार मोठा होता. माहूर-नांदेड साडेतीन तास. पुढे नंदीग्राम एक्सप्रेस ने मुंबई. एकूण प्रवास १७-१८ तासांचा. गाडी सुरु झाली. खिडकी शेजारची जागा होती. बाकी लाल डब्ब्यात खिडकीची जागा मिळणं म्हणजे भाग्यच. त्या काळी बस ला लाल डब्बाच म्हणायचे. लाल परी वगैरे म्हणत नव्हते.
गाडीने वेग घेतला तसा गार वारा चेहऱ्यावर आदळायला लागला, आपसूकच डोळे मिटले गेले. गेल्या २-३ महिन्याचा घटनाक्रम डोळ्यांसमोर यायला लागला. खूप दगदग झाली होती या काळात.
गेले ३ महिने दर आठवड्याला जायचो माहूर ला. शुक्रवारी ठाण्याहून नंदीग्राम एक्सप्रेस ने निघायच. शनिवारी काम उरकायचं आणि रविवारी त्याच ट्रेन ने परत. कारणही तसंच होत. आम्ही माहूर ला विकासघर सुरु केल होतं. गरीब, आदिवासी मुलांना शिक्षणाची गोडी लावून त्यांना शाळेतले विषय समजावून द्यायचे. त्यासाठी शिक्षकांची नियुक्ती, त्यांचे पुण्याला प्रशिक्षण, वर्गासाठी जागा शोधणे आणि मुख्य म्हणजे मुलांना विकासघरा पर्यंत आणणे. दिव्यच होते ते. पुण्यात ग्राम मंगल सोबत समन्वयाची जबाबदारी सौरभ ने घेतली. माहूर ची जबाबदारी अजित ने. आईची प्रेरणा आणि मदत होतीच. अर्थात याविरुद्धही बऱ्याच लोकांचे मत होतेच. काही लोकांनी सल्ले दिले कि इथे काही करून उपयोग नाही. मुलांना शिक्षणात अजिबात रस नाही. एका स्थानिक शिक्षकाने तर इथल्या मुलांचा बुध्यांक कमी असतो आणि म्हणून तुमच्या प्रयत्नांना काही अर्थ नाही असेही ज्ञान दिले होते. बऱ्याचश्या लोकांना अशी शंका होती कि काहीतरी आर्थिक फायदा असणार ... त्याशिवाय उगाच कोणी कशाला शहरातून गावात येऊन असले उद्योग करतोय!
काही लोकांनी मदत केली. काहींनी विरोध. बरेच लोक नुसतेच मजा पाहत होते.
आम्ही मात्र वेगळे होतो. त्याशवाय का अनंत अडचणींतून मार्ग काढून ३ महिन्यात सुरु केल विकासघर? आणि ग्राम मंगल च्या प्राची ताईंनी हि पावती दिली होती... कि लोक नुसतेच चर्चा करत राहतात, तुम्ही सरळ कृती करून दाखवलीत. त्या दिवशी पहिला वर्ग भरला होता. तब्बल ३० मुलं आली होती. त्यांच्या पालकांनी धन्यवाद दिले आम्हाला. गावातल्या थोर मोठ्यांनी कौतुक केले. फार छान वाटले होते . अभिमान वाटला की आपण सर्वसामान्यांसारखे नाहीत. या ३० मुलांचे भविष्य बदलणार आपण.
विचार करता करता कधी झोप लागली कळलंच नाही. जाग आली ती उमरखेड ला बस थांबली तेंव्हा. खूप गर्दी झाली होती गाडीत. एक म्हातारी आजी बाई काठी टेकवत आत चढली. उभे राहायला जागा नव्हती तिथे तिला बसायला काय जागा मिळणार होती? मी जरा आजू बाजूला पहिले. सीट वर बसलेल्यांपैकी अनेक जण तरुण होते. त्यांनी उठायला नको या म्हातारी साठी? साध सौजन्य नाहीये लोकांना. स्वार्थी सगळे. मीच उठलो शेवटी. आजीला बसायला जागा दिली. आजी छान हसली. लमाणी भाषेत तोंड भरून आशीर्वाद दिले. ती काय बोलली ते मला फार कळाल नाही. पण बहुधा म्हणाली असेल कि तुझ्या सारखे लोक फार कमी असतात बेटा जे स्वतः च्या सुखाचा त्याग करून दुसऱ्यांना मदत करतात. खरंच होत ना ते. आपण या गर्दीपेक्षा वेगळे आहोत नाही का? असा विचार करत उभा राहिलो तास भर.
पावणे सहा वाजले होते आणि गाडी अजून नांदेड शहरात शिरली नव्हती. अजून १० मिनिट लागणार स्टेशन ला पोचायला. सहा ची ट्रेन नको मिस व्हायला. दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये क्लायंट व्हिसिट होती आणि त्यात माझ्यावर महत्वाची जबाबदारी होती. त्यामुळे पहाटे पर्यंत मुंबईत जायलाच हवं होतं.
मोबाइल वर पाहिलं तर ट्रेन पंधरा मिनिटे लेट होती. चला बरं झालं. स्टेशन बाहेर टपरी वर चहा घेता येईल जरा ५ मिनिटे थांबून.
असा विचार करतो न करतो तोच बस थांबली स्टेशन समोर. लगबगीने उतरायच होतं पण वाट बघितली सगळ्यांनी उतरण्याची . सगळे उतरल्यावर मग मी उतरलो. सौजन्य आहे ना आपल्यात. या लोकांसारखे कुठे आहोत आपण?
तोबा गर्दी होती आज रस्त्यावर. झप झप चालत निघालो. एक द्रुश्य पाहून मात्र जागेवरच थबकलो. एक आजी बाई रस्त्याच्या कडेला चिखलात पडलेली होती. जरा निरखून पाहिल्यावर खात्री झाली कि यात्रा संपली होती तिची. अंगावरच्या सुरकुत्यांवरून सत्तरीतली असावी. कपाळावर कुंकू नव्हत. लुगडं फाटलेलं. हातात बांगड्या नाहीत. शरीर यष्टी अत्यंत कृष. रस्स्त्यावरच जगत असेल बहुधा . नवरा गेल्यावर मुलानि काढून दिल असेल घरातून. मिळेल ते खाऊन जगत असेल बिचारी. मुलांच जाऊ द्या. आता ही मरून पडलीये रस्त्यावर. इतके लोक चाललेत शेजारून पण कुणी थांबून बघत नाहीये. कसली ही घाई झालीये लोकांना. असंख्य विचार मनात येऊन गेले.
काय करावं? थांबावं का? हिच्या नातेवाईकांचा शोध घ्यायचा का? जरा आजूबाजूला टपरी वाल्यांना विचारून कळेल काही तरी. की पोलिसांना बोलवायचं?
इतक्यात गाडीची शिट्टी ऐकू आली. माझीच ट्रेन आली असणार. काय करावे? उद्याची कस्टमर मीटिंग? जायलाच हवं. जाता जाता ओझरता तिचा चेहरा पाहिला. हसू होतं तिच्या चेहेऱ्यावर. ते हसूच अस्वस्थ करत होतं मला.
फार विचार न करता पळतच प्लॅटफॉर्म वर आलो आणि गाडीत शिरलो. आईला निघाल्याचं आणि रश्मीला मी उद्या नक्की येणार आहे याचे फोन करून झाले. हिला मी परतीच्या गाडीत बसेपर्यंत भरवसा नसतो. एव्हाना गाडी निघाली होती. आईने दिलेले धपाटे काढले बॅगेतून. धपाटे आणि मीठ भुरका यात आमच्या आईचा हात कोणी धरू शकणार नाही. एरवी मला ट्रेन मध्ये सह-प्रवाश्यांशी गप्पा मारायला आवडते. त्यात नांदेड गाडीत हमखास कोणी तरी ओळखीचं भेटतच. औरंगाबाद येईपर्यंत गप्पा मारून, काही मित्रांना फोन करून, जरा मोबाइल वर टाईम पास करून वरच्या बर्थ वर जाऊन झोपायचं हा नित्य कार्यक्रम.
पण आज काही लक्ष लागेना. जाणीवपूर्वक प्रयत्न करूनही त्या म्हातारीचा चेहरा काही डोळ्यांसमोरून जात नव्हता. हसत होती ती माझ्यावर. तिच्या त्या प्राणहीन डोळयांनी माझे डोळे मात्र खाडकन उघडले होते. ती सांगत होती की मीही त्या गर्दीतलाच एक होतो जे तिच्यासाठी थांबले नव्हते. सगळा अभिमान गळून पडला होता. मीच जर एवढा परोपकारी होतो तर का नाही सोडून दिली ती ट्रेन? काय अधिकार होता मला त्या बस मधल्या लोकांना नावं ठेवायचा? एकच माणूस वेगळ्या परिस्थितीत वेगळा वागू शकतो. पण हेच जर खरं असेल तर मग चांगल्या कामांच श्रेय आपण घ्यायच आणि जे करता नाही आले त्याला परीस्थितिला जबाबदार धरायच हे योग्य आहे का?
पोट फुटेपर्यंत जेवून उरलेलं अन्न अनाथाश्रमात देऊन आपण दानशूर? भिकाऱ्याला सुद्धा आपण फक्त चिल्लर देतो. आणि चिल्लर नसेल तर सरळ हात वर करतो ना, की जातो शंभर चे सुट्टे करायला?
उपनिषदांत दानाचा अर्थ दिलाय "सम्यक विभाजन". ज्याच्याकडे जे विपुल आहे त्याने ते वाटावे. आणि जो घेतोय त्यानेही कमीपणा वाटून घेऊ नये. ज्याच्याकडे धन विपुल आहे त्याने धन वाटावे , ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळ द्यावा. कोणी कष्टाने मदत करावी तर कोणी नुसता आनंद वाटावा. पण मुख्य म्हणजे या देण्याचा अभिमान वाटून घेऊ नये.
परीक्षित राजाची एक गोष्ट आठवली. या पुण्यवान राजाच्या मेंदूत कलिने एक क्षण प्रवेश केला आणि त्या एका क्षणात त्याच्याकडून पाप घडलं होतं. आणि आता तर घोर कलियुग आहे. कोण जाणे कदाचित आपल्या सदैव भ्रष्ट असणाऱ्या मेंदूत एका क्षणासाठी प्रवेश करून देवच पुण्य घडवून आणत असेल.
जेंव्हा जेंव्हा "ग" ची बाधा होते, तेंव्हा तेंव्हा "ती" येतेच स्वप्नात आकाशात उडणाऱ्या मला परत जमिनीवर आणायला.
जवळपास ७ वर्षांपूर्ची गोष्ट आहे. माहूरचं एक काम आटोपून परत निघालो होतो. अजित आला होता बस-स्टँड वर सोडायला. अडीच वाजताची पांढरकवडा नांदेड गाडी लागलेली होती. त्यात आधी जाऊन जागा पकडली आणि मग उस्मान भाई कडून खारे दाणे , ठाकरे मामाकडून वर्तमान पत्र घेणे, भिक्षुकांना असेल ती चिल्लर देणे, असा नेहेमीचा कार्यक्रम उरकून जागेवर येऊन बसलो. प्रवास फार मोठा होता. माहूर-नांदेड साडेतीन तास. पुढे नंदीग्राम एक्सप्रेस ने मुंबई. एकूण प्रवास १७-१८ तासांचा. गाडी सुरु झाली. खिडकी शेजारची जागा होती. बाकी लाल डब्ब्यात खिडकीची जागा मिळणं म्हणजे भाग्यच. त्या काळी बस ला लाल डब्बाच म्हणायचे. लाल परी वगैरे म्हणत नव्हते.
गाडीने वेग घेतला तसा गार वारा चेहऱ्यावर आदळायला लागला, आपसूकच डोळे मिटले गेले. गेल्या २-३ महिन्याचा घटनाक्रम डोळ्यांसमोर यायला लागला. खूप दगदग झाली होती या काळात.
गेले ३ महिने दर आठवड्याला जायचो माहूर ला. शुक्रवारी ठाण्याहून नंदीग्राम एक्सप्रेस ने निघायच. शनिवारी काम उरकायचं आणि रविवारी त्याच ट्रेन ने परत. कारणही तसंच होत. आम्ही माहूर ला विकासघर सुरु केल होतं. गरीब, आदिवासी मुलांना शिक्षणाची गोडी लावून त्यांना शाळेतले विषय समजावून द्यायचे. त्यासाठी शिक्षकांची नियुक्ती, त्यांचे पुण्याला प्रशिक्षण, वर्गासाठी जागा शोधणे आणि मुख्य म्हणजे मुलांना विकासघरा पर्यंत आणणे. दिव्यच होते ते. पुण्यात ग्राम मंगल सोबत समन्वयाची जबाबदारी सौरभ ने घेतली. माहूर ची जबाबदारी अजित ने. आईची प्रेरणा आणि मदत होतीच. अर्थात याविरुद्धही बऱ्याच लोकांचे मत होतेच. काही लोकांनी सल्ले दिले कि इथे काही करून उपयोग नाही. मुलांना शिक्षणात अजिबात रस नाही. एका स्थानिक शिक्षकाने तर इथल्या मुलांचा बुध्यांक कमी असतो आणि म्हणून तुमच्या प्रयत्नांना काही अर्थ नाही असेही ज्ञान दिले होते. बऱ्याचश्या लोकांना अशी शंका होती कि काहीतरी आर्थिक फायदा असणार ... त्याशिवाय उगाच कोणी कशाला शहरातून गावात येऊन असले उद्योग करतोय!
काही लोकांनी मदत केली. काहींनी विरोध. बरेच लोक नुसतेच मजा पाहत होते.
आम्ही मात्र वेगळे होतो. त्याशवाय का अनंत अडचणींतून मार्ग काढून ३ महिन्यात सुरु केल विकासघर? आणि ग्राम मंगल च्या प्राची ताईंनी हि पावती दिली होती... कि लोक नुसतेच चर्चा करत राहतात, तुम्ही सरळ कृती करून दाखवलीत. त्या दिवशी पहिला वर्ग भरला होता. तब्बल ३० मुलं आली होती. त्यांच्या पालकांनी धन्यवाद दिले आम्हाला. गावातल्या थोर मोठ्यांनी कौतुक केले. फार छान वाटले होते . अभिमान वाटला की आपण सर्वसामान्यांसारखे नाहीत. या ३० मुलांचे भविष्य बदलणार आपण.
विचार करता करता कधी झोप लागली कळलंच नाही. जाग आली ती उमरखेड ला बस थांबली तेंव्हा. खूप गर्दी झाली होती गाडीत. एक म्हातारी आजी बाई काठी टेकवत आत चढली. उभे राहायला जागा नव्हती तिथे तिला बसायला काय जागा मिळणार होती? मी जरा आजू बाजूला पहिले. सीट वर बसलेल्यांपैकी अनेक जण तरुण होते. त्यांनी उठायला नको या म्हातारी साठी? साध सौजन्य नाहीये लोकांना. स्वार्थी सगळे. मीच उठलो शेवटी. आजीला बसायला जागा दिली. आजी छान हसली. लमाणी भाषेत तोंड भरून आशीर्वाद दिले. ती काय बोलली ते मला फार कळाल नाही. पण बहुधा म्हणाली असेल कि तुझ्या सारखे लोक फार कमी असतात बेटा जे स्वतः च्या सुखाचा त्याग करून दुसऱ्यांना मदत करतात. खरंच होत ना ते. आपण या गर्दीपेक्षा वेगळे आहोत नाही का? असा विचार करत उभा राहिलो तास भर.
पावणे सहा वाजले होते आणि गाडी अजून नांदेड शहरात शिरली नव्हती. अजून १० मिनिट लागणार स्टेशन ला पोचायला. सहा ची ट्रेन नको मिस व्हायला. दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये क्लायंट व्हिसिट होती आणि त्यात माझ्यावर महत्वाची जबाबदारी होती. त्यामुळे पहाटे पर्यंत मुंबईत जायलाच हवं होतं.
मोबाइल वर पाहिलं तर ट्रेन पंधरा मिनिटे लेट होती. चला बरं झालं. स्टेशन बाहेर टपरी वर चहा घेता येईल जरा ५ मिनिटे थांबून.
असा विचार करतो न करतो तोच बस थांबली स्टेशन समोर. लगबगीने उतरायच होतं पण वाट बघितली सगळ्यांनी उतरण्याची . सगळे उतरल्यावर मग मी उतरलो. सौजन्य आहे ना आपल्यात. या लोकांसारखे कुठे आहोत आपण?
तोबा गर्दी होती आज रस्त्यावर. झप झप चालत निघालो. एक द्रुश्य पाहून मात्र जागेवरच थबकलो. एक आजी बाई रस्त्याच्या कडेला चिखलात पडलेली होती. जरा निरखून पाहिल्यावर खात्री झाली कि यात्रा संपली होती तिची. अंगावरच्या सुरकुत्यांवरून सत्तरीतली असावी. कपाळावर कुंकू नव्हत. लुगडं फाटलेलं. हातात बांगड्या नाहीत. शरीर यष्टी अत्यंत कृष. रस्स्त्यावरच जगत असेल बहुधा . नवरा गेल्यावर मुलानि काढून दिल असेल घरातून. मिळेल ते खाऊन जगत असेल बिचारी. मुलांच जाऊ द्या. आता ही मरून पडलीये रस्त्यावर. इतके लोक चाललेत शेजारून पण कुणी थांबून बघत नाहीये. कसली ही घाई झालीये लोकांना. असंख्य विचार मनात येऊन गेले.
काय करावं? थांबावं का? हिच्या नातेवाईकांचा शोध घ्यायचा का? जरा आजूबाजूला टपरी वाल्यांना विचारून कळेल काही तरी. की पोलिसांना बोलवायचं?
इतक्यात गाडीची शिट्टी ऐकू आली. माझीच ट्रेन आली असणार. काय करावे? उद्याची कस्टमर मीटिंग? जायलाच हवं. जाता जाता ओझरता तिचा चेहरा पाहिला. हसू होतं तिच्या चेहेऱ्यावर. ते हसूच अस्वस्थ करत होतं मला.
फार विचार न करता पळतच प्लॅटफॉर्म वर आलो आणि गाडीत शिरलो. आईला निघाल्याचं आणि रश्मीला मी उद्या नक्की येणार आहे याचे फोन करून झाले. हिला मी परतीच्या गाडीत बसेपर्यंत भरवसा नसतो. एव्हाना गाडी निघाली होती. आईने दिलेले धपाटे काढले बॅगेतून. धपाटे आणि मीठ भुरका यात आमच्या आईचा हात कोणी धरू शकणार नाही. एरवी मला ट्रेन मध्ये सह-प्रवाश्यांशी गप्पा मारायला आवडते. त्यात नांदेड गाडीत हमखास कोणी तरी ओळखीचं भेटतच. औरंगाबाद येईपर्यंत गप्पा मारून, काही मित्रांना फोन करून, जरा मोबाइल वर टाईम पास करून वरच्या बर्थ वर जाऊन झोपायचं हा नित्य कार्यक्रम.
पण आज काही लक्ष लागेना. जाणीवपूर्वक प्रयत्न करूनही त्या म्हातारीचा चेहरा काही डोळ्यांसमोरून जात नव्हता. हसत होती ती माझ्यावर. तिच्या त्या प्राणहीन डोळयांनी माझे डोळे मात्र खाडकन उघडले होते. ती सांगत होती की मीही त्या गर्दीतलाच एक होतो जे तिच्यासाठी थांबले नव्हते. सगळा अभिमान गळून पडला होता. मीच जर एवढा परोपकारी होतो तर का नाही सोडून दिली ती ट्रेन? काय अधिकार होता मला त्या बस मधल्या लोकांना नावं ठेवायचा? एकच माणूस वेगळ्या परिस्थितीत वेगळा वागू शकतो. पण हेच जर खरं असेल तर मग चांगल्या कामांच श्रेय आपण घ्यायच आणि जे करता नाही आले त्याला परीस्थितिला जबाबदार धरायच हे योग्य आहे का?
पोट फुटेपर्यंत जेवून उरलेलं अन्न अनाथाश्रमात देऊन आपण दानशूर? भिकाऱ्याला सुद्धा आपण फक्त चिल्लर देतो. आणि चिल्लर नसेल तर सरळ हात वर करतो ना, की जातो शंभर चे सुट्टे करायला?
उपनिषदांत दानाचा अर्थ दिलाय "सम्यक विभाजन". ज्याच्याकडे जे विपुल आहे त्याने ते वाटावे. आणि जो घेतोय त्यानेही कमीपणा वाटून घेऊ नये. ज्याच्याकडे धन विपुल आहे त्याने धन वाटावे , ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळ द्यावा. कोणी कष्टाने मदत करावी तर कोणी नुसता आनंद वाटावा. पण मुख्य म्हणजे या देण्याचा अभिमान वाटून घेऊ नये.
परीक्षित राजाची एक गोष्ट आठवली. या पुण्यवान राजाच्या मेंदूत कलिने एक क्षण प्रवेश केला आणि त्या एका क्षणात त्याच्याकडून पाप घडलं होतं. आणि आता तर घोर कलियुग आहे. कोण जाणे कदाचित आपल्या सदैव भ्रष्ट असणाऱ्या मेंदूत एका क्षणासाठी प्रवेश करून देवच पुण्य घडवून आणत असेल.
जेंव्हा जेंव्हा "ग" ची बाधा होते, तेंव्हा तेंव्हा "ती" येतेच स्वप्नात आकाशात उडणाऱ्या मला परत जमिनीवर आणायला.